*राज्य-
1.मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ संयुक्तरित्या मुंबईच्या पालिका मुख्यल्यामध्ये 'हेरिटेज वॉक' हा उपक्रम सुरू करत आहे.मुंबईची पुरातन व ऐतिहासिक असल्ल्या महानगरपालिकेच्या या वास्तूची आता सर्वसामान्यांनाही सैर करता येणार आहे.या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाली.
2.अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी आद्यक्ष ,तसेच जेष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे रुद्धपकाळाने निधन झाले.त्यांनी 60 हुन अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे.चतुर चंपा,मधूमुरली गुरख्याच पोर,चंद्रपरी आणि सोनसखा ही त्यांची काही पुस्तके.
![]() |
| शंकर सारडा |
3.न्यायदानामध्ये सलग दुसऱ्या वेळेसही महाराष्ट्र संपूर्ण देशात अवल स्थानी.टाटा जस्टीस ट्रस्ट उपक्रमाअंतर्गत सादर केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.न्यायदानामधील पहिली प्रमुख पाच राज्ये खालीलप्रमाणे-
1.महाराष्ट्र
2.तमिळनाडू
3.तेलंगणा
4.पंजाब
5.केरळ
4.सिंधुदुर्ग येथील 'मायरेस्टिका स्वाम्प' जंगलाला जैविक वारसा स्थळ म्हणून राज्य सरकारने घोषित केले .हा महाराष्ट्रातील गोड्या पाण्याच्या दलदलीचा एकमेव अधिवास आहे.
![]() |
| मायरेस्टिका स्वाम्प जंगल |
*राष्ट्रीय-
1.ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढणाऱ्या खेड तालुक्यातील पाळू गावच्या रेणुका गुरव या कर्तबगार महिलेची दखल घेत भारतीय डाक विभागाने रेणुका यांचे फोटो असलेले पोस्ट तिकीट तयार करून त्यांचा गौरव केला .
2.केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पश्चिम बंगालच्या विधानसभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
3.देशाचा GDP ग्रोथ रेट 7.7% घसरण्याची तर पुढीलवर्षी 11 % नि वाढण्याचा सरकारचा अंदाज .
*आंतरराष्ट्रीय -
1.अमेरिकन कंपनी असलेल्या Apple च्या तिमाहिमध्ये झाली वाढ.कंपनीने कोरोना काळातही कमावले 100 अब्ज डॉलर .
2.भूतान येथील विश्वसहित्य शांतता आणि मानवाधिकार मंचाने कवी सुधाकर गायधने याना आंतरराष्ट्रीय शांतिदुत या पुरस्काराने सन्मानित केले हा पुरस्कार मानवाधिकार व शांततेची मांडणी करणाऱ्या साहित्यिकाला दिला जातो.
![]() |
| सुधाकर गायधने |
![]() |
| बासमती तांदूळ |
3.बासमती तांदूळ पाकिस्तानचा GI Tag .बासमती तांदूळ पाकिस्तानची नवी ओळख.




No comments:
Post a Comment